यशस्वी कोण होतं?


   दैनदिन कामकाजात आपण इतके व्यस्त असतो की आपल्याला स्वतःविषयी विचार करायला वेळच मिळत नाही. मग त्यात आणखी खोलात जाऊन आपले ध्येय, आकांक्षा याविषयी विचार करण्यास वेळ कुणाकडे असणार? म्हणजेच माणूस त्याचे लाक्षणीक ध्येय जसे सरकारी कामे, कार्यालयीन कामे, जेवणे, झोपणे, इत्यादि पूर्ण करण्यातच सगळा वेळ वाया घालवतो. माणसेतर प्राणीही असंच काहीतरी करत असतात. त्यांनाही असे लाक्षणीक ध्येयच साध्य करायचे असतात. फक्त त्यांचे प्रकार थोडे वेगळे असतात. माणसेतर प्राण्यांना पोट भरणे हे काम अधिक महत्वाचे असते. मी आजपर्यंत कुठला असा माणसेतर प्राणी पाहिला नाही जो त्याच्या भविष्याचा विचार करुन काही कामे करत असेल (मुंगी या किटकासारखे अपवाद वगळता). मग माणसातला आणि इतर प्राण्यांतला फरक कुठे पहावयास मिळतो?
   असा फरक फक्त यशस्वी माणसांतच दिसतो. जी माणसे यशस्वी झालीत, ती काही एका दिवसात नव्हे, त्यामागे त्यांची बर्‍याच दिवसांची मेहनत असते. जेव्हा तुम्हा आम्हासारखी माणसे आजचा विचार करण्यात व्यस्त असतात, तेव्हा कुठेतरी अज्ञातवासात भावी यशस्वी माणसे त्यांच्या भविष्याचा विचार करण्यात गर्क असतात. आणि एक दिवस अचानक आपल्यातलाच कुणीतरी या यशस्वी माणसांच्या पंक्तीत जाऊन बसलेला आपल्याला दिसतो.
   मग सगळेच विचार करणारे यशस्वी होतात काय? नाही. ज्यांच्या विचारांना योग्य आचरणाची साथ मिळते तेच लोक यशस्वी होतात.
   खालील ४ प्रमुख मुद्दे जे यशस्वी लोकांत पहावयास मिळतातः-
१) भविष्याचा विचार – दुरदृष्टी.
२) योग्य विचारांचे आचरण.
३) सातत्य.
४) पहिल्या तीन मुद्यांच्या आचरणात कुठलीच कसर सोडत नाहीत.